Showing posts with label maharashtra. Show all posts
Showing posts with label maharashtra. Show all posts

Saturday, January 13, 2018

लेण्यांचा जगात -कोंडाणा लेणी / Kondane Caves

     महाराष्ट्र !!! सह्यन्द्रीच्या अंगावर असणाऱ्या अजस्त्र किल्ले आणि लेणी 'शिल्पांनी नटलेला ...रायगड जिल्यातील कर्जत तालुका हा सह्यन्द्रीच्या डोंगररांगेच्या निसर्गाने नटलेला परिसर ,मुंबईपासून अगदीच जवळ असल्याने येथे भटक्यांची नेहमीच वर्दळ असते . राजमाची,सोंडाई,कोथळीगड यासारख्या किल्यांनी नटलेल्या कर्जत तालुक्यात एक अतिप्राचीन लेणी वसलेली आहेत.  कर्जत मधल्या कोंडिवडे गावात या बोध्दकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेल्या आहेत . राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच आपणाला या लेणी लागतात .

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणारी सकाळीची कर्जत ट्रेन पकडून आम्ही जाणार होतो ,प्रवीण आणि तन्मय दोघांना हि सुट्टी नसल्यामुळे ऑफिस वरूनच येणार होते दोघेही आम्हला कल्याणला भेटले  . ठरल्याप्रमाणे पहिल्या डब्यामध्ये मी आणि लहू चढलो ,ट्रेन मध्ये खूपच गर्दी होती ...आमचा प्रवास चालू झाला .पुढे कर्जतला उतरून आम्ही गरमागरम पोहे आणि वडापाव खाऊन पुढील प्रवास चालू केला .

इथून पुढे श्रीराम ब्रिज पर्यंत आम्ही रिक्षा केली प्रत्येकी १० रुपये रिक्षावाले घेतात ,तिथून पुढे आपणाला कोंडीवडे गावात जायला सहा सीटर भेटतात . प्रत्येकी ३० रुपये कोंदिवडे गावात जाण्यासाठी घेतात . श्रीराम ब्रिज ते कोंडिवडे  गावापर्यंतचा प्रवास फारच सुंदर होता. संपूर्ण परिसर धुक्याची शाल पांघरून घेतलेली आणि अंगाला लागणारीधंडी  यामुळे प्रवास अगदी सुखकारक झाला . नागमोडी गावातून जाणारी वाट एकाबाजूस वाहणारी उल्हास नदी आणि एकाबाजूस रायगड जिल्यातील सह्यन्द्रीची रांग . १३ किलोमीटरचा प्रवास करायला साधारण आम्हला ४५ मिनटं लागली . कोंडीवडे गावात आम्ही येऊन पोचलो प्रत्येक गावात त्या गावाच एक ग्रामदैवत असत या गावातल्या ग्रामदेवतांच्या मंदिराच दर्शन घेतलं ,मंदिराच्या घुमटाचा आकर्षक पद्धतींनी बांधकाम केलेलं आहे ,दरवाजावर दोनी बाजूस आकर्षक द्वारपाल कोरलेले आहेत आत सुंदर ग्रामदेवतांची पाषाणात कोरलेली मूर्ती आहेत  . दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरु केला.
पिपळाच्या पानाच्या आकाराची कमानी

 कोंडिवडे गावाच्या आतून परत आपणाला एक ते दोन किलोमीटर चालत मुख्य ट्रेकचा सुरवातीच्या पॉईंट वर पोहचावे लागते आपण पाहिजे तर पुढे जाण्यासाठी रिक्षा सुद्धा करू शकतो पण आम्ही चालतच जाण ठरवलं .उल्हास नदीच्या बाजूने जाणारी डांबरी रस्ता पकडून पायपीट सुरु केली ,लांबून दिसणाऱ्या डोंगररांगेत कुठल्या डोंगरात लेणी कोरल्या असतील याचा अदाज लावायला चालू झाला  .आम्ही सकाळीच गावात पोचल्यामुळे नदीच्या पात्रात गावातील बऱ्याच बायका कपडे धुण्यासाठी आल्या होत्या त्यान्चाकडे विचारपूस करून आम्ही कोंडाणे लेण्याचा मुख्य वाटेवर येऊन पोहचलो आता येथून चढाईस सुरवात करायची होती जवळपास १ते १. ३० तसाच हे अंतर आहे . अर्धा एक तासानंतर आपणाला कोंडाणे धबधबा लागतो पाऊसमध्य येथे पर्यटकांची बरीच गर्दी असते . थोडावेळ विश्रांती घेऊन परत निघालो . पुढे जंगल घनदाट होत जात ,जंगलातून फिरताना सह्यन्द्री मध्ये फिरणारे प्राणी आपणाला बराच वेळेस दिसतात ,या वेळी काळ्या तोंडच वानर पुढे बसल्याच आम्हला प्रवीण ने सांगत मग सावधहोऊन पुढे गेलो तेव्हा दगडावर बसलेल्या वानर  बघयला भेटला . जवळजवळ १ते १. ३० तासाच्या पायपिटी नंतर आम्ही कोंडाणा लेणी पर्यंत पोहचलो .लेणी बाहेरून पाहिल्यावरच आपल्या तोंडातून अप्रतिम हे शब्द अपूणच  निघतात. थोडा वेळ विश्रम घेऊन आम्ही लेणी बघण्यास सुरवात केली .
पहिल्या गुहेंत असलेलं स्तूप 

 कोंडाणा लेणी मध्ये आपणाला चैत्य ,विहार आणि दोन गुहा आहेत ,विहाराच्या छतावर चित्रे काढली आहेत पण ती आता थोडीशी मिटलेली आहेत . पहिली गुंफा म्हणजे चैत्य किंवा चैत्यगृह हे बॉंद्ध लोकांचे प्रार्थनास्थळ असते ,येथे बोद्ध लोकांच्या समाध्या असतात . .चैत्य ग्रहाचा मध्यभागी आपणाला भग्नावस्थेतला असलेलं मोठा अंडाकृती आकाराचं शिल्प दिसत याला स्तुप्त असं बोलतात . हे स्तुप्त सध्या भग्नावस्थेत आहे .बाजूला अषट्कोनी आकाराचे १३ खांब आहेत .   चैत्य गृह अंदाजे ९ मीटर उंच आहे ,सुरवातीला लाकडाच्या पानाच्या आकाराची कमानी आहे . अशाच  प्रकारची लाकडी कमानी आपणाला कार्ले भाजे लेण्यांमध्ये आहे . आणि चैत्य गुहेंच्या सुरवातीला पिपळ्याच्या पानाच्या आकारामध्ये नक्षी काम केलं आहे ,हे नक्षी काम बघताना आपणाला नक्कीच कोरणाराचे आश्चर्य वाटत . चेत्यचा भिंतीवर आपणाला ,वेदिकापट्टी ,नक्षीदार जाळी काम आणि नृत्य करणारे कलाकार कोरलेले दिसतात या कलाकारांच्या अंगावरचे अलंकार आणि त्याचा हातात आभूषणे आणि धनुष्य बाणाप्रमाणे शस्त्र आहेत .
नक्षीकाम 
याच्या पुढची गुहा म्हणजे विहार,आपणाला ७ते ८ दगडी पायऱ्या चालून वरती जावं लागत . या विहाराची उंची ५फूट ८इंच आणि १८ फूट लांबीची आहेत . विहाराच्या भिंतींमध्ये विश्राम घेण्यासाठी १४ खोल्या कोरलेल्या आहेत . प्रत्येक दरवाजा नक्षीदार कोरलेला आत एकावेळी एकाच माणूस राहील एवडीच जागा आणि विश्राम घेण्यासाठी एक चोंकोनी दगडाचा पलंग केलेला आहे .
विरहाराच्या भिंतीवर कोरलेलं स्तूप 
विहार 
विरहाच्या डाव्या भिंतीवर आपणाला एक स्तूप कोरलेलं आहे ते सुस्थित आहे. विरहाच्या तीनही भिंतीवर सुंदर नक्षी काम केलेलं आहे . छपरावर आपणाला चोकोनी आकाराचं नक्षी काम दिसत . विरहाच्या भिंती काळ्या रंगाच्या झाल्या आहेत . समोरची भिंत विध्वस्थ झाली आहे ,इथून आपणाला समोरच सुंदर दृश्य बघावयास मिळते .
भितिंवरच सुंदर रेखीव नक्षीकाम 
त्यालाच लागून आपणाला तीसरी आणि चौथी  गुहा लागते , या गुहा रिकाम्या आहेत ,यामध्ये नक्षी काम केलेलं नाही आहे .चौथ्या  गुहे मध्ये पाणी साठलेलं दिसत . पाऊसात येथून   सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारा धबधबा वाहतो . लेण्या पाहून झल्यावर आम्ही समोरच्या  धबधब्यचा पात्रात जेवण्यासाठी बसलो .बऱ्याच वेळ गप्पा मारत जेवण करून झाल्यावर आम्ही परतीचा प्रवास चालू केला .परतीच्या प्रवासात आतापर्यंतच्या भटकंती मध्ये पहिल्यांचवेळी बिनविषारी साप बघतला . आम्हला बघून तो त्याचा मार्गानी परत निघून गेला . उन्हामुळे थकवा जाणवत होता पाऊले पटापट टाकत आम्ही परतीचा प्रवास करत होतो .



जाण्याचा मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत ट्रेन ने प्रवास पुढे , श्रीराम  ब्रिज ते कोंदिवडेगाव रिक्षाने जावे

जेवणाची सोय- गावामध्ये जेवणाची सोय होते ,पाणी स्वतः घेऊन जावे .

बघण्यासारखे - कोंडाणे धबधबा , सह्यन्द्रीचे सोंदर्य , प्राचीन बौद्धिक लेणी , लेण्यांचा अप्रतिम रेखीव कोरीव काम

व्हिडीओ स्वरूपात बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की भेट द्या ,आणि चॅनेल subscribe  करायला विसरू नका

धन्यवाद . !
अंकुश सावंत .