Saturday, June 9, 2018

हरिहर गड - वास्तुस्थापत्याचे सौंदर्य

     नाशिक !!! किल्यांचा प्रदेश ...  नाशिक जिल्यात एवढे किल्ले तर नक्कीच आहेत कि आपण संपूर्ण किल्ले फिरायचे म्हंटले तर दर वीकएंड ला एक ट्रेक केला  तरी एक महिना आपणाला पुरणात नाही आणि नाशिक जिल्ह्यतील सर्वच किल्ले म्हणजे बुलंद , अवघड या श्रेणी मध्ये मोडणारे, किल्ला सर करायचं म्हंटल कि २ ते ३ तासांची तांगडतोड करावी लागणारच . बरेच दिवस ऑफिस आणि PC च्या जगात घालवल्यावर आता ओढ होती सह्यद्रीची बऱ्याच दिवसापासून हरिहर या किल्यावर जाण्याची इच्छा होती काही कारणास्तव जाणे होत नव्हतं .शेवटी योग  आला ऑफिस वरून शिफ्ट नंतर बॅगा भरून रात्री ११.५० ची कसाऱ्याला जाणारी लोकल पकडली आणि मोहिमेची सुरवात झाली , यावेळी बरेच रोजचे साथीदार नव्हते.  लहू ,तन्मय आणि मी रोजचे आणि विजय , सचिन , हॅरी आणि आशिष हे नवीन चार जण मिळून आम्ही ७ जण होतो . कसाऱ्याला १.५० चा दरम्यान पोहचलो कसाऱ्या वरून मी आधीच हरिहर ला जाणयासाठी  गाडी बुक केली होती .


सकाळच्या मंद प्रकाशात दिसणारा हरिहरगड
रात्री २ वाजता हरिहर गडाच्या पायथ्यला असलेल्या निरगुनपाडाया   गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला .५० किलोमीटरचा हा प्रवास होता . मध्ये एका हॉटेल मध्ये थांबून एक फक्कड चहा झाला आणि पुन्हा प्रवास चालू झाला .  निरगुनपाडा गावाच्या जवळ जवळ पोहचलो आणि रांगडा गड रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात दिसू लागला. गावात बरीच ट्रेकर मंडळी आली होती. 

 गावात पोहचल्यावर गावात जेवणाची आणि नाश्त्याची सोय करायची होती .  गावात पोहचून गाडीवाल्या ओळखीच्या एका दादांना जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली आणि मग सर्वचजण रस्त्यावरच बसून गप्पा मारू लागले , मोकळ्या आभाळाकडे बघत चांदण्या न्हाहळत  गप्पा मारण्याचा अनुभव काही औरच होता. गप्पा मारत मारत सकाळचे ५ कधी वाजले समजलंच नाही . गावातल्या दादांकडे पोहे आणि चहा चा नाश्ता करून आम्ही किल्याचा दिशेने प्रवास सुरु केला . 

किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक 
डांबरी रस्ता  ओलांडून शेताच्या मळ्यातून रस्ता किल्याकडे जातो .साधारण हा दोन ते तीन तासाचा सोपी श्रेणीचा ट्रेक आहे पण , ८० डिग्री असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या मुळे हा गड मध्यम  श्रेणी मध्ये मोडतो. प्रवास सुरु झाला आणि किल्याचा डाव्या बाजूला जायला आम्ही सुरवात केली पण  , गावातले एक आजोबा भेटले आणि त्यानी सांगितलं कि तुम्ही वाट चुकलायत , डाव्या बाजूने नका जाऊ उजव्या बाजूने जा तेव्हा तुम्ही मुख्य पठारावर पोहचाल. किल्याकडे जाताना नेहमी उजव्या बाजूने चालत जावे. सुरवातीला झाडा झुडपात जाणारी सोपी वाट आता अवघड होतचाली होती .एक ट्रेकर ग्रुप वाट चुकून एका उंच कातळ मध्यावर अडकले होते त्याना आवाज देऊन मुख्य  वाटेस  मागे येण्यास सांगितले आणि आमचा प्रवास सुरु केला .मे महिना असल्यामुळे वाटे मध्ये करवंद आणि आंबे हा गावरान मेवा मानस्तोक्त खात खात प्रवास चालू होता .
कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या 
गावापासून बराच लांबचा टप्पा पार केला आणि सहयाद्री ची अजस्त्र रांग दिसू लागली ..दीड  तासा मध्ये आम्ही मुख्य पठारावर पोहचलो .पठारावरून आपणाला आपल्या उजव्या बाजूस फणी हा एक नागाच्या फण्यासारखी सुळका असलेला डोंगर दिसतो आणि त्याचा बाजूस भास्करगड दिसतो  .बराच वेळ आराम आणि फोटो काडून  झाल्यावर मुख्य दगडी पायऱ्याकडे जाणारी वाट पकडली .  हि वाट अवघड आहे ,उन्हा मुळे माती निसरडी झालेली त्यामुळे  पाय अगदी जपूनच टाकावा लागत होता.
सरळ पायऱ्या 
थोड्याच वेळात आम्ही हरिहरच खास वैशिष्ट्य असलेल्या कातळपायऱ्याच्या जवळ पोहचलो.कितीवेळ तरी एकटक त्या पायऱ्यांकडे  फक्त बघतच रहावं असं सौन्दर्य या पायऱ्यांच आहे. बराच वेळ इथे पायऱ्यांचा  पायथ्याशी घालवल्यावर एक एक करून आम्ही चढाईला सुरवात केली. एका वेळी एकच जण वरती जाईल एवडीचं वाट आहे .प्रत्येक पायरी मध्ये केलेल्या खोबणी मुळे चढाई सुखरूप होते . सावधगिरीने चढाई केली कि आपणाला दोन बुरुजांमध्ये असलेला महादरवाजा लागतो .भगवा शेंदूर फासलेला महादरवाजा पार झाला कि गणेशाची सुंदर कोरीव मूर्ती कातळात कोरलेला आहे. इथून पुढे जाणारा मार्ग म्हणजे अचंबित करून सोडणार आहे ,दगडी कातळामध्ये कोरलेला अर्ध वर्तुळकाळ भुयारी मार्ग म्हणजे आश्चर्यच ! इथून आपणाला भास्करगड , फणी डोंगर दिसतो.  पुढे चालत गेलो कि परत आपणाला ६० ते ७० वरती जाणाऱ्या एकेरी पायऱ्या लागतात .हरिहर गड म्हणजे वास्तू स्थापत्याचा अप्रतिम नमुना एक आश्चर्य संपलं कि पुढे एक आश्चर्य पुढे आहेच ... आम्ही सर्वानी सावधगिरीने कातळातमधील  हा मार्ग पार करून .दुसऱ्या भग्न दरवाजातून आम्ही  मुख्य पठारावर येऊन पोहचलो. 
ब्रह्मगिरी पर्वत रांग 
किल्यावर जास्त काही अवशेष शिल्लक नाही आहेत . आपणाला पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो  .काठावरच हनुमानाची शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहे .  त्याचाच बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी च दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो . वाटेत आम्हला वाड्याचे काही अवशेष दिसले ते पाहत आम्ही पुढे गेलो . तसच पूर्वेकडे चालत गेलो कि आपणाला लागते सुस्थितीत असलेली एक खोली लागते.  या खोलीचा वापर पूर्वी दारुगोळा साठा ठेवण्यासाठी किंवा धान्यसाठा ठेवण्यासाठी होत असावा . गडावर राहायचं म्हंटल तर या इमारतीमध्य १० ते १५ जणांची राहण्यासाठी सोय होऊ  शकते . ऊन बरंच वाढलं होत खोलीच्या सावली मध्य बराच वेळ बसून गप्पा मारल्यानंतर आम्ही पुढे किल्यावरच्या सर्वात उंच ठिकाणी निघालो . गडाच्या या टेकडीवर चढताना मात्र रॉक पॅचिंगच थ्रिल अनुभवायला आपणाला मिळालं . वरती चढताना मात्र सर्वांचीच दमछाक झाली. टेकडीवरचा उंच भगवा फडकताना पहिला कि मराठ्यांचा इतिहासाची आठवण होते आणि अंगात वेगळाच उत्साह संचारतो .सर्वजण वरती चढले  आणि सर्वानी महाराजांच्या नावाचा गजर  करत एकच जल्लोष केला. आमचा रोजचा विडिओ सेल्फी घेऊन झाला .
मोकळ्या अंगणात केलेलं जेवण 
वरून आपणाला उत्तरेला दिसते  ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही  चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे  हरिहरचा ट्रेकचा  थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत  मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच  भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा  ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
महादरवाजाच्या इथे काढलेला सेल्फी 



किल्याचा इतिहास - हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला. 


किल्ला हरिहर - हर्षगड

तालुका त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक

उंची - ११२० मीटर

चढाई श्रेणी - मध्यम

योग्य कालावधी - सपेंबर ते फेब्रुवारी ( भर पावसात हा ट्रेक करू नये )

हरिहर गड ला कसे जाल - मध्य रेल्वेने कसारा या स्टेशन पर्यंत पोहचावे . तिथून आपणाला बस किंवा खाजगी वाहनाने निर्गूणपाडा या गाव मध्य जाऊ शकतो

खाजगी वाहन आधीच बुक करण्यासाठी
प्रकाश - ९८२३९८६२३३   ( private  गाडी साठी यांना संपर्क करा )

आमची भटकंती बघण्यासाठी आमच्या youtube  चॅनेल ला subscribe करा .




Tuesday, January 30, 2018

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! ( Kalsubai )

"शिवाजी महाराज टर्मिनस वरुन सुठनारी कसारा लोकल थोड्याच वेळात प्लेटफॉर्म क्रमांक एकवर येत आहे " ही अनाउंसमेंट एकूण धावतच प्लेटफार्म क्रमांक एक गाठला आणि आमच्या कळसुबाईच्या प्रवासाला सुरवात झाली . तर आज आम्ही चालोय इगतपुरी तालुक्यातील बारी गावत असलेल्या महाराष्ट्राचा एवरेस्ट   म्हणजे कळसुबाई शिखरावर... कळसुबाई सर करणे हे प्रत्येक भटक्यांचं एक आकर्षण असत .  खूप दिवस जाण्याचा मानस होता पण काहींना काही कारणास्तव जमत नव्हते या वेळी मात्र प्रवीण,तन्मय आणि लहू आम्ही तिघांनी मिळून फिक्स केलं .ऑफिस मधून तिघे नवीन मित्र बिलाल , सिराज आणि इंदर आमच्या सोबत यायला उत्सुक्त होते ,आणि सोबत अनिल आणि विजय सुद्धा येणार होते सर्व मिळून आम्ही ९ जण होतो. 

कल्याणला प्रवीण आणि तन्मय भेटलो ,इंदर, बिलाल आणि सिराज या तिघांनी घाटकोपर वरून ११. ५० ची कसारा लोकल पकडली आम्ही ६ जणांनी तीच लोकल कल्याण वरून पकडली आणि प्रवासाला सुरवात झाली , सर्वांची ओळख करून दिली आणि प्रवास सुरु झाला . यावेळी प्रवीण ने पूर्णपणे प्रवासाची परफेक्ट प्लॅनिंग केली होती ..कसारा पासून  पुढे बारी गावापर्यंत जाण्यासाठी आधीच गाडी बुक केली होती ,गावामध्ये नाश्ता आणि जेवणाची सोय सुद्धा केलेली होती ... जवळजवळ २ वाजता कसऱ्यला  पोचलो स्टेशन चा बाहेर ३०ते ४० वय असलेले ड्राइवर दादा आमची वाट बघत होते .

आमचा बारी गावाच्या दिवशीने  प्रवास सुरु झाला ,ड्राइवर दादांचा सोबतच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या . मध्ये मग चहा साठी एका टपरी वर गाडी थांबवली आणि फक्कड चहाचा ब्रेक घेऊन थेट बारी गाव गाठले ,गावामध्ये जेवणाची नाश्त्याची सोया सुद्धा  गावातील एका  तरुण गोरक्ष भिडे यांच्याकडे आधीच करून ठेवली होती, ड्राइव्हर काकांसोबत आम्ही त्याचा घरी पोहचलो..रात्रीचे जवळजवळ ३ वाजलेले ... दरवाजा ठोकवल्यावर त्यांनी दरवाजा उघडून त्याने हसून स्वागत केले ...

जवळच असलेल्या त्याचा दुसऱ्या घराकडे आम्हाला तो घेऊन गेला.कळसुबाई ला येणाऱ्यांसाठी राहण्याची सोया म्हणून त्यांचे हे घर होत . ऐसपैस ३ रूम असलेला घर होत ,त्याने दरवाजा उघडून आम्हाला फ्रेश होयला सांगितलं  स्वतः आमच्या नाश्त्याची तयारी करायला गेला ...फ्रेश होऊन झाल्यावर गोरक्ष नाश्ता घेऊन आला , गरमागरम कांदे पोहे आणि चहा गप्पा मारत खाण्याची मज्जा काही औरच ! गोरक्ष आणि आमच्या  त्याचा इथे राहायला येणाऱ्या ट्रेकर्सच्या अनुभवाच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या!

बोलता बोलता सकाळचे ५ वाजले  होते गोरक्ष कडे जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही बॅग घेऊन आम्ही कळसुबाई कडे कूच केली ,गोरक्ष मुख्य वाटे पर्यंत आमच्या सोबत पुढील वाट दाखवण्यासाठी आला होता ,पुढे जाणारी मुख्य पायवाट आणि कसे जायचे सांगून तो परत गेला . पण त्याचा सोबत आलेली गावातली  दोन भटकी " बिनपगारी गाईड कुत्री" आम्हाला जॉईन झाली , अनोळख्या रस्त्या वर त्यांची खूपच मदत होणार होती ...
गोरक्ष आणि आम्ही 
दिसले ती पायवाट हातातल्या बॅटरीच्या उजेडात तुडवत होतो ... बिलाल ,सिराज आणि इंदर तिघांची पहिलीच ट्रेक असल्याने त्यांची दमछाक झाली होती ,आता जरा चड  लागला होता मग समोर ३-४ वाटा  फुटल्या होत्या डावीकडे जाणारच तेवढ्यात बाजूलाच असलेल्या झोपडीतून "कुठं जायचं? उजवीकडून सरळ जा  ..नायतर चुकाल ...पुढं कळसुबाई च मंदिर लागल  ... " असा आवाज आला धन्यवाद बोलून उजवीकडे वळलो ..
गावातील कळसुबाई मंदिर 
इथून भंडारदरा अर्धा किलोमीटर असल्यामुळे इथे  थंडी बरीच असते  , थोड्या पुढे गेल्यावर कळसूबाईचे मंदिर लागलं , ज्या देवीच्या भक्तांना वर पर्यंत जाणे शक्य नसते त्याचा साठी देवीचे मंदिर खाली बांधलेलं आहे ,भगवा शेंदूर , नत आणि गळ्यात दागिने घालून सजवलेल्या देवीच्या नतमस्तक होऊन आम्ही फुडील प्रवासास सुरवात केली , मंदिराच्या मागील वाट थेट कळसुबाई शिखरावर जाते ,
मंदिरापासून केलेली सुरवात


वाट जास्त अवघड नव्हती ,आजचा सूर्योदय ७. १२ ला होणार होता ,महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावरून सूर्योदय पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती ...मग सर्वांचीच पाऊले झपाझप न थांबता पडत होती , आम्ही वाट चुकलो तरी सोबतची कुत्री आम्हला मुख्य  वाटेला घेऊन जात, सह्यन्द्री मध्ये भटकताना सोबत असणारी हे सोबती खरच कसली हि अपेक्षा न ठेवता खूप मदत करतात ...
डोंगराच्या पाठीमागून झालेला सूर्योदय 
आठवणीतला सूर्योदय 
सूर्यनारायणाच्या दर्शन घेण्याची वेळ झाली होती ,पूर्व कडील संपूर्ण सह्यन्द्रीची रांग लाल सोनेरी रंगात न्हाऊन निघाली होती ... अप्रतिम नजारा  होता ! थोड्याच वेळात आम्ही पहिल्या शिडी पर्यंत पोहचलो ... कळसुबाई वर पोहचेपर्यंत आपणाला ४ लोखंडी शिडया लागतात ,त्यातील पहिली शिडी लागली प्रत्येकजण शिडी काळजीपूर्वक मन शांत ठेवून सर्वचजण चढले आणि सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यास सज्ज झाले ... थोड्याच वेळात गोलाकार लाल रंगातला सूर्य सह्यन्द्री मधून डोके वर करू  लागला , हा अनुभव शब्दात सांगणं केवळ अशख्यच ,त्यासाठी तिथे उभे राहूनच ते स्वर्गसुख अनुभवावं लागत ..  सूर्योदया सोबत फोटो घेण्याचा मोह कोणीही आवरू शकत नव्हता ..    बराच वेळ आपण किती चढाई करून वरती आलो ते बघून झाल्यावर पुढील प्रवास चालू केला
वर चढताना लागणाऱ्या लोखंडी शिड्या 
सह्यन्द्रीची डोंगररांग 

दुसरी आणि तिसरी शिडी सुद्धा पार  झाली ,शिडीमुळे शिखराची चढाई बरीच सोपी होते...या शिड्या २० वर्षांपूर्वी लावण्यात आल्या आहेत . शिडी चढताना अगदी सावधगिरी बाळगून चढत होते ... चढाई करताना मध्यच थांबून विश्राम घेऊन परत पायपिट चालू  करत होतो  ...जवळपास १ ते २ तासाच्या चढाईनंतर आम्ही एका पठारावर येऊन पोहचलो आणि सर्वानीच दमून बॅगचें  ओजी जमीनीवर टाकत खांद्यांचा भार कमी केला ... इथून आपणाला सह्यन्द्रीची अदभूत रांग दिसते आणि त्यावर फिरणारे पवनचक्की च्या रांगेचं दृश्य अप्रतिम दिसत होत. .. बराच वेळ अराम करून , आणलेल्या केळी ,सफरचंद खाऊन पेटपूजा झाली, सोबतच्या कुत्र्यांना बिस्केट भरवून पुढील वाटचालीला आम्ही सुरवात केली .
एक शिखर पार करून आल्यावरती दिसणार शेवटचा कळसुबाई माथा 
 कळसुबाई शिखराची गंमत म्हणजे आपण कितीहि वरती आलो तरी मुख्य शिखराचे दर्शन आपणाला होत नाही .शेवटच्या  माथ्यावर पोहचल्यावर मुख्य शिखराचे दर्शन होते ...दहा ते पंधरा मिनिट चाल्यावरती एक थंड पाणी असलेली विहीर लागते ,सोबतच्या कुत्र्यांनी  पाणी पिऊन तहान भागवली ..
शेवठची शिडी 
 कळसुबाई चा मंदिर समोर दिसूनही आम्हाला अर्धा तासाच्या वरती वेळ चौथ्या शिडी पर्यंत पोचण्यास लागला , चौथी शिडी म्हणजे ८० डिग्री असलेली शिडी ,खूपच सावधिगिरीने पार करावी लागत होती ,ती शिडी पार केली आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला .. आजूबाजूचे दृश्य थक्क करून टाकणारे होते ... पूर्वेकडून विश्रामगड,बितनगड आणि सह्यन्द्रीतलं सर्वात कठीण ट्रेक अलंग - मलंग - कुलंग दिसत होते , उत्तरेकडे औढा, पट्टा ,हरिहरगड , त्रीगलवाडी ,कावनई हे गड आहेत .... दक्षिणेकडे  हरिश्चन्द्रगड , रतनगड , खुट्टा सुळका आणि आजूबाजूचा डोंगर आहे , शिखरावरून भंडारदर्याला विस्त्रीन जलाशयाचे दर्शन होते ... सर्व काही अप्रतिम होते ...!
अलंग मदन कुलंग किल्ला 
भंडारदऱ्याचा  अप्रतिम नजारा 
शिखराच्या मध्यभागी कळसुबाईचे देऊळ आहे भगवा रंग आणि गोल घुमट असलेलं मंदिरआपलं  लक्ष्य वेधून घेत, मंदिराशेजारी त्रिशुंलं आणि काही घंटा बांधलेल्या आहेत ..मंदिराच्या आत बसून देवीचं दर्शन घेतलं एका वेळेस दोन जण बसतील एव्हडीच जागा आत आहे ... मंदिराच्या आतमध्ये खूपच गारवा आहे ..या कळसुबाई देवी विषयी एक दांत कथा प्रचलित आहे प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती राहाळात राहत होती. कामाच्या निमित्ताने ती इंदुरे गावात आली. इंदुरे गावात ती पाटलाच्या घरी काम करू लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती, की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा, पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला केरकचरा काढण्यास व भांडी घासण्यास लावली. त्यामुळे कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच  हा कळसुबाईचा डोंगर होय. 
सोबती 
दुपारचे दीड वाजायला आले होते .. बराच वेळ आजूबाजूचा परिसर फिरून , फोटो काडून झाल्यावर थोडी पेटपूजा केली आणि परतीची तयारी झाली ,तो पर्यंत बघतो तर काय एक  ५० वर्षाचे आजोबा हात मध्य नारळाचं पोत आणि डोकयावर  पाण्याचा हंडा घेऊन शिडी चडून वरती येत होते .. आम्ही त्यांना बघून थक्कच  होतो ... 
काका येणाऱ्या देवीच्या भक्तांसाठी नारळ आणि लिंबू पाणी विकण्यासाठी आले होते ... 
काका किती वेळ लागला वरती यायला ?
"दोन तासा मंदी आलू वरती "रोज येता ?..." हो रोजच येतु  "... मग काकांकडून नारळ घेऊन देवीला अर्पण करून काकांचा राम राम घेऊन .. गावाचा दिशेनं उतरण्यास सुरवात केली ..
कळसुबाई देवीच मंदिर 
पाऊलांची गती फारच मंदावली होती ... सकाळची ५ तासांच्या चढाईने पाय अगदी मोडकळीस आले होते ... दिघेंजण नवीन असून तिघांनीही न थकता शिखर सर केला होता ,चढताना ज्या शिड्या सहज चढलो होतो त्या उतरताना मात्र थोड्या अवघडच वाटत होत्या.

आम्ही उतरतांना बरीच मंडळी कळसुबाई डोंगर चढत होते, सर्वच जण आता थकले होते मग मध्यच एक काका लिंबू पाणी विकत होते मग, लिंबू पाणी पिऊन सर्वचजण फ्रेश झाले . आणि पुढील प्रवास चालू झाला . शेवटच्या टप्प्यात आम्ही पोचलो होतो
चढाई नंतर काढलेला ग्रुप फोटो 
गावातली कौलारू घर दिसू लागली ,आम्हाला ३ तास उतरताना लागले ... शेवढी एकदाचे पोहचलो ... फ्रेश होऊन सर्वजण जेवायला बसले .गोरक्षने जेवणाची तयारी केली मटण आणि चपात्या ,बटाटयाची भाजी ,वाट्यान्ची उसळ ,आमटी,कोशिंबीर ,पापड  ... जेवणाचा फक्कड बेत गोरक्षने केला होता . पोटभर जेवण झाले ,तेव्हड्यात ड्राइव्हर दादा आले गोरक्ष चा धन्यवाद मानून त्याचा निरोप घेतला. सह्यन्द्री प्रेमींची तो मनापासून कसली हि अपेक्षा न ठेवता कित्यक वर्ष सेवा करत आहे .

गाडी मध्य बसून प्रवास चालू झाला बसताच काही जण झोपी गेले ... १६४६ मीटर उंच महाराष्ट्रातील उंच शिखर सर केल्याचा आनंद आणि समाधान सर्वांचाच चेहऱयावर दिसत होते ... मध्यावरून अनुभवलेलं सकाळचा सूर्योदय , शेवटच्या माथ्यवरून पाहिलेलं निळभोर आकाश आणि चारी बाजूने पसरलेली किल्यांची रांग ... सर्व काही सुंदर अनुभव मनाच्या एका कप्यात साठवत आमचा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरु झाला .... !

  

कळसूबाई शिखर - समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 5400 फूट म्हणजे 1646 मीटर


जाण्यासाठी मार्ग : सेंट्रल लाईन लोकल ने कसारा रेल्वे स्टेशन ला उतरून  तुम्ही खाजगी गाडीने बारी गावात जाऊ शकता , 
किंवा इगतपुरी ला जाणाऱ्या एक्सप्रेस पकडून इगतपुरी स्टेशन ला उतरून पुढे बारी गावात जाण्यासाठी महाराष्ट महामंडळाच्या बस सेवा उपलब्ध आहे . 

कळसुबाई ला जायचं असल्यास कसारा वरून गाडी बुक करू शकता.  
९२२६५५११६
जेवण आणि नाश्ता करण्यासाठी 
गोरक्ष खडे - ९५२७६८६१६६


धन्यवाद !
अंकुश सावंत 
+९१ ९७६८१५३११४


Saturday, January 13, 2018

लेण्यांचा जगात -कोंडाणा लेणी / Kondane Caves

     महाराष्ट्र !!! सह्यन्द्रीच्या अंगावर असणाऱ्या अजस्त्र किल्ले आणि लेणी 'शिल्पांनी नटलेला ...रायगड जिल्यातील कर्जत तालुका हा सह्यन्द्रीच्या डोंगररांगेच्या निसर्गाने नटलेला परिसर ,मुंबईपासून अगदीच जवळ असल्याने येथे भटक्यांची नेहमीच वर्दळ असते . राजमाची,सोंडाई,कोथळीगड यासारख्या किल्यांनी नटलेल्या कर्जत तालुक्यात एक अतिप्राचीन लेणी वसलेली आहेत.  कर्जत मधल्या कोंडिवडे गावात या बोध्दकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेल्या आहेत . राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच आपणाला या लेणी लागतात .

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणारी सकाळीची कर्जत ट्रेन पकडून आम्ही जाणार होतो ,प्रवीण आणि तन्मय दोघांना हि सुट्टी नसल्यामुळे ऑफिस वरूनच येणार होते दोघेही आम्हला कल्याणला भेटले  . ठरल्याप्रमाणे पहिल्या डब्यामध्ये मी आणि लहू चढलो ,ट्रेन मध्ये खूपच गर्दी होती ...आमचा प्रवास चालू झाला .पुढे कर्जतला उतरून आम्ही गरमागरम पोहे आणि वडापाव खाऊन पुढील प्रवास चालू केला .

इथून पुढे श्रीराम ब्रिज पर्यंत आम्ही रिक्षा केली प्रत्येकी १० रुपये रिक्षावाले घेतात ,तिथून पुढे आपणाला कोंडीवडे गावात जायला सहा सीटर भेटतात . प्रत्येकी ३० रुपये कोंदिवडे गावात जाण्यासाठी घेतात . श्रीराम ब्रिज ते कोंडिवडे  गावापर्यंतचा प्रवास फारच सुंदर होता. संपूर्ण परिसर धुक्याची शाल पांघरून घेतलेली आणि अंगाला लागणारीधंडी  यामुळे प्रवास अगदी सुखकारक झाला . नागमोडी गावातून जाणारी वाट एकाबाजूस वाहणारी उल्हास नदी आणि एकाबाजूस रायगड जिल्यातील सह्यन्द्रीची रांग . १३ किलोमीटरचा प्रवास करायला साधारण आम्हला ४५ मिनटं लागली . कोंडीवडे गावात आम्ही येऊन पोचलो प्रत्येक गावात त्या गावाच एक ग्रामदैवत असत या गावातल्या ग्रामदेवतांच्या मंदिराच दर्शन घेतलं ,मंदिराच्या घुमटाचा आकर्षक पद्धतींनी बांधकाम केलेलं आहे ,दरवाजावर दोनी बाजूस आकर्षक द्वारपाल कोरलेले आहेत आत सुंदर ग्रामदेवतांची पाषाणात कोरलेली मूर्ती आहेत  . दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरु केला.
पिपळाच्या पानाच्या आकाराची कमानी

 कोंडिवडे गावाच्या आतून परत आपणाला एक ते दोन किलोमीटर चालत मुख्य ट्रेकचा सुरवातीच्या पॉईंट वर पोहचावे लागते आपण पाहिजे तर पुढे जाण्यासाठी रिक्षा सुद्धा करू शकतो पण आम्ही चालतच जाण ठरवलं .उल्हास नदीच्या बाजूने जाणारी डांबरी रस्ता पकडून पायपीट सुरु केली ,लांबून दिसणाऱ्या डोंगररांगेत कुठल्या डोंगरात लेणी कोरल्या असतील याचा अदाज लावायला चालू झाला  .आम्ही सकाळीच गावात पोचल्यामुळे नदीच्या पात्रात गावातील बऱ्याच बायका कपडे धुण्यासाठी आल्या होत्या त्यान्चाकडे विचारपूस करून आम्ही कोंडाणे लेण्याचा मुख्य वाटेवर येऊन पोहचलो आता येथून चढाईस सुरवात करायची होती जवळपास १ते १. ३० तसाच हे अंतर आहे . अर्धा एक तासानंतर आपणाला कोंडाणे धबधबा लागतो पाऊसमध्य येथे पर्यटकांची बरीच गर्दी असते . थोडावेळ विश्रांती घेऊन परत निघालो . पुढे जंगल घनदाट होत जात ,जंगलातून फिरताना सह्यन्द्री मध्ये फिरणारे प्राणी आपणाला बराच वेळेस दिसतात ,या वेळी काळ्या तोंडच वानर पुढे बसल्याच आम्हला प्रवीण ने सांगत मग सावधहोऊन पुढे गेलो तेव्हा दगडावर बसलेल्या वानर  बघयला भेटला . जवळजवळ १ते १. ३० तासाच्या पायपिटी नंतर आम्ही कोंडाणा लेणी पर्यंत पोहचलो .लेणी बाहेरून पाहिल्यावरच आपल्या तोंडातून अप्रतिम हे शब्द अपूणच  निघतात. थोडा वेळ विश्रम घेऊन आम्ही लेणी बघण्यास सुरवात केली .
पहिल्या गुहेंत असलेलं स्तूप 

 कोंडाणा लेणी मध्ये आपणाला चैत्य ,विहार आणि दोन गुहा आहेत ,विहाराच्या छतावर चित्रे काढली आहेत पण ती आता थोडीशी मिटलेली आहेत . पहिली गुंफा म्हणजे चैत्य किंवा चैत्यगृह हे बॉंद्ध लोकांचे प्रार्थनास्थळ असते ,येथे बोद्ध लोकांच्या समाध्या असतात . .चैत्य ग्रहाचा मध्यभागी आपणाला भग्नावस्थेतला असलेलं मोठा अंडाकृती आकाराचं शिल्प दिसत याला स्तुप्त असं बोलतात . हे स्तुप्त सध्या भग्नावस्थेत आहे .बाजूला अषट्कोनी आकाराचे १३ खांब आहेत .   चैत्य गृह अंदाजे ९ मीटर उंच आहे ,सुरवातीला लाकडाच्या पानाच्या आकाराची कमानी आहे . अशाच  प्रकारची लाकडी कमानी आपणाला कार्ले भाजे लेण्यांमध्ये आहे . आणि चैत्य गुहेंच्या सुरवातीला पिपळ्याच्या पानाच्या आकारामध्ये नक्षी काम केलं आहे ,हे नक्षी काम बघताना आपणाला नक्कीच कोरणाराचे आश्चर्य वाटत . चेत्यचा भिंतीवर आपणाला ,वेदिकापट्टी ,नक्षीदार जाळी काम आणि नृत्य करणारे कलाकार कोरलेले दिसतात या कलाकारांच्या अंगावरचे अलंकार आणि त्याचा हातात आभूषणे आणि धनुष्य बाणाप्रमाणे शस्त्र आहेत .
नक्षीकाम 
याच्या पुढची गुहा म्हणजे विहार,आपणाला ७ते ८ दगडी पायऱ्या चालून वरती जावं लागत . या विहाराची उंची ५फूट ८इंच आणि १८ फूट लांबीची आहेत . विहाराच्या भिंतींमध्ये विश्राम घेण्यासाठी १४ खोल्या कोरलेल्या आहेत . प्रत्येक दरवाजा नक्षीदार कोरलेला आत एकावेळी एकाच माणूस राहील एवडीच जागा आणि विश्राम घेण्यासाठी एक चोंकोनी दगडाचा पलंग केलेला आहे .
विरहाराच्या भिंतीवर कोरलेलं स्तूप 
विहार 
विरहाच्या डाव्या भिंतीवर आपणाला एक स्तूप कोरलेलं आहे ते सुस्थित आहे. विरहाच्या तीनही भिंतीवर सुंदर नक्षी काम केलेलं आहे . छपरावर आपणाला चोकोनी आकाराचं नक्षी काम दिसत . विरहाच्या भिंती काळ्या रंगाच्या झाल्या आहेत . समोरची भिंत विध्वस्थ झाली आहे ,इथून आपणाला समोरच सुंदर दृश्य बघावयास मिळते .
भितिंवरच सुंदर रेखीव नक्षीकाम 
त्यालाच लागून आपणाला तीसरी आणि चौथी  गुहा लागते , या गुहा रिकाम्या आहेत ,यामध्ये नक्षी काम केलेलं नाही आहे .चौथ्या  गुहे मध्ये पाणी साठलेलं दिसत . पाऊसात येथून   सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारा धबधबा वाहतो . लेण्या पाहून झल्यावर आम्ही समोरच्या  धबधब्यचा पात्रात जेवण्यासाठी बसलो .बऱ्याच वेळ गप्पा मारत जेवण करून झाल्यावर आम्ही परतीचा प्रवास चालू केला .परतीच्या प्रवासात आतापर्यंतच्या भटकंती मध्ये पहिल्यांचवेळी बिनविषारी साप बघतला . आम्हला बघून तो त्याचा मार्गानी परत निघून गेला . उन्हामुळे थकवा जाणवत होता पाऊले पटापट टाकत आम्ही परतीचा प्रवास करत होतो .



जाण्याचा मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत ट्रेन ने प्रवास पुढे , श्रीराम  ब्रिज ते कोंदिवडेगाव रिक्षाने जावे

जेवणाची सोय- गावामध्ये जेवणाची सोय होते ,पाणी स्वतः घेऊन जावे .

बघण्यासारखे - कोंडाणे धबधबा , सह्यन्द्रीचे सोंदर्य , प्राचीन बौद्धिक लेणी , लेण्यांचा अप्रतिम रेखीव कोरीव काम

व्हिडीओ स्वरूपात बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की भेट द्या ,आणि चॅनेल subscribe  करायला विसरू नका

धन्यवाद . !
अंकुश सावंत .


Wednesday, November 29, 2017

मराठयांचा पराक्रमाची साक्ष देणारा - वसईचा किल्ला / Vasai fort

  जलदुर्ग आणि भुईकोट या दोन्ही प्रकारात मोडणार वसईचा किल्ला ,पश्चिम रेल्वे स्टेशनचा वसई जवळच असणारा हा किल्ला आजही मराठयांच्या  चिमाजी आप्पा यांचा पराक्रमाची साक्ष आजही देत उभा आहे . सकाळी डोंबिवली वरून मी ,लहू आणि तन्मयने ५. ३३ वाजता सुटणारी डोंबिवली ते विरार ट्रेन पकडून थेट वसई गाठले आणि पुढे मग वसई महानगरपालिकेचा १०५ नंबरच्या बसने किल्लाबंदर स्थानकावर उतरलो , १५मिनीटांच्या प्रवासानंतर बस आपणाला थेट किल्याचा आत मध्ये घेऊन जाते . 
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23559796_1416616511782410_785332928150219820_n.jpg?oh=0e5281243faa1324d829fabc7ab89488&oe=5A8E8BAF
मुख्य कोरीव दरवाजा
गडाचा विस्तार हा खूपच मोठा आहे संपूर्ण गड  फिरावयास आपणास साधारण २ते २. ३० तास लागतात .किल्ला पाहण्यास कुठून  सुरवात करावी हे आम्हांला कळत  नव्हते म्हणून एका रिक्षा वाल्यास विचारल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणे मुख्य दरवाजा पासून आम्ही सुरवात केली. दरवाजातून आत गेल्यावर आपणाला पायऱ्या लागतात यातूनवर तटबंदीवर गेल्यास आपणाला गडाचा संपूर्ण परिसर पाहावयास भेटतो ,तटाची उंची ३० ते ३५ फूट आहे . किल्याला एकूण दहा बुरुज आहेत त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदियाम रैस मागो, सेंट गोंसोले चौथा माद्रद दीय. चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोर वाटा आहेत. पाचवा सेंट जॉन, या बुरुजानंतर दर्या दरवाजा आहे. येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे. सहावा एलिफांत, सातवा सेंट पेद्रु, आठवा सेंट पॉल्स, नववा सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरुज. किल्ल्यामध्ये एकूण तीन चर्च आहेत .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23435202_1416615718449156_678409274660305329_n.jpg?oh=e667048e14754584e41b78c8521347fe&oe=5ACCE9C5https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23472726_1416615991782462_2399303751600333268_n.jpg?oh=6d4812544ac3669c9a8181d3482a671d&oe=5AD03D59

 किल्याचे प्रत्येक भाग पाहताना आपणास किल्ले बांधणाऱयांचे कौतुक करावेसे वाटते आणि आश्चर्य वाटत . गडावरच्या आतमधला परिसर विस्तीर्ण आहे यात एक विहीर आहे ,आतमध्ये एक आपणास तळे  आणि दोन विहिरीसारखे चौकोनी अवशेष असलेला चौथरा आहे. आम्ही एका चर्चसारखया इमारतीजवळ पोहचलो येथे आपणास एक बुरुज लागतो या बुरुजाच्या पायऱ्या सुस्थतीत असल्यामुळे आपण बुरुजाच्या शेवट्पर्यंत जाऊ शकतो . आम्ही वरती पोहचलो येथून दिसणारा समुद्र किनारयाचा नजारा  अप्रतिम दिसतो आणि  आपण किल्याचा संपूर्ण  परिसरहि  पाहू शकतो . या बुरजामुळे समुद्रामधून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवले जात असे . किल्याचे बांधकाम हे रोमन स्थापकलेचा वापर करून बांधलेलं आहे .एखाद्या चर्च प्रमाणे यातील इमारतींचे बांधकाम केलेले आहे .  सण १४१४ साली मध्य भंडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा  किल्ला बांधला पुढे पोर्तुगिजाने हा किल्ला जिंकून याचे बरेचसे पुनर्बांधकाम केले ,दहा वर्षाच्या कालावधीत त्यानी हे बांधकाम पूर्ण केले
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23473103_1416616431782418_6471311287708567872_n.jpg?oh=bf791737bf77bd427273ea7b998655df&oe=5A8A9816https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23472014_1416615765115818_5143508420064194966_n.jpg?oh=fc8a121539552b3446084e7d1b560c22&oe=5AD22F2B
किल्याच्या आतील तळ आणि सुंदर इमारतींचे अवशेष
जवळपास आम्ही संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर आम्ही किल्यामधल्या  पेशवेकालीन वज्राई देवीच्या मंदिरात पोहचलो . चिमाजी अप्पा यांनीया देवीला नवस केला होता कि आम्ही हा किल्ला जिंकलो कि यामंदिराचा जीर्णोद्धार करू ,मग चिमाजी अप्पानी हा किल्ला जिंकला आणि चिमाजी अप्पा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला . 
आम्ही मंदिरात पोहचलो तेव्हा मंदिराचे पुजारी देवीस वस्त्र नेसवत होते ,त्या मुळे  आम्हला देवीचं दर्शन घेता आले नाही ,आम्ही बाजुचा नागेश्वर मंदिरात शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले . मंदिराच्या गाभऱ्यात शंकराची पिंडी आहे घाबरायचं चौकटी वर आपणास गणेशाची मूर्ती कोरली आहे ,मंदिराच्या एका बाजूच्या भिंतीवर गणेशाची रिद्धी सिद्धी ची मूर्ती आणि एका बाजूस देवीची मूर्ती कोरली आहे . पिंडीच्या समोर महादेवाच्या नंदीची सुबक मूर्ती आणि दगडात कोरलेला कासव आहे . 
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23376259_1416615921782469_91471680613488202_n.jpg?oh=57b25b184af3d1f75e64e10c73ef3942&oe=5A99E1C9
टेहळणी बुरुज
बराच वेळ मंदिराच्या शांत परिसरात वेळ घालवल्या नंतर आम्ही किल्ल्याचा  दर्या दरवाजाकडे निघालो दरवाजाचे बुरुज अजूनही सुस्थतीत आहेत  ,पण लाखडी दरवाजा हा मोडकलेल्या अवस्थेत आहे . येथून पुढे समोर चालत गेल्यावर आपण समुद्राच्या बंदरावर जाऊन पोचतो ,किनाऱयावर  मच्छिमार कोळि लोकांची लगबग चालू होती . थोडावेळ येथे फिरून आम्ही चिमाजी अप्पांच्या वाड्याकडे निघालो.चिमाजी अप्पांच्या वाड्यामध्येच पुरात्तव विभागाने हे स्मारक बांधले आहे . बाजूलाच चिमाजी अप्पांचा वाड्याचे अवशेष लागतात . वाडा खूप मोठा आहे . वाड्याचा आणि सुपूर्ण किल्ल्यामध्ये ताडीची झाडे खूप आहेत .या परिसरात फिरताना आपणास चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची आठवण  आल्याशिवाय राहत नाही .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23319162_1416616078449120_2130858257811400593_n.jpg?oh=59b5ee13415e9096d0e0efd9539b8201&oe=5ACCDC3Bhttps://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23435061_1416616311782430_4781297620595681226_n.jpg?oh=673c7d9372a0470be81536914212e85e&oe=5A8EA07C
इ. स १७३७ साली मराठयांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला मग पुढे बाजीराव पेशव्यांनी हि मोहीम चिमाजी अप्पांवर सोपवली १७३८ साली चिमाजी अप्पानी मोहीम आखली . चिमाजी अप्पानी किल्याचा दलदलीच्या बाजूनी हल्ला करावयाचे ठरवले ,तटाच्या  उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सेन्य हरहर महादेव करत आत शिरले , दोन दिवस चालेल्या या पोर्तुगाच्या विरुद्धचा लढाईत पोर्तुनगांचे ८०० जण मारले गेले , मराठयांची हि बरीच हानी झाली . पोर्तुगाचं दारुगोळा संपला आणि ते मराठांशी शरण आले ,मराठ्यनी बायकापोरांना  सुखरूप बाहेर जाऊ दिले ,आणि मराठ्यांनी किल्ला सर केला भगवा फडकला .
https://scontent.fbom15-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/23380407_1416615811782480_6637866781104477269_n.jpg?oh=dbbb9ab3bc82c86317ab31f91b472318&oe=5A94DCA5
नरवीर चिमाजी अप्पा स्मारक
बराच वेळ किल्यावर भटकंती केल्यावर आम्ही पुन्हा बस पकडून वसई स्टेशन वर पोहचलो आणि मग ,विरार -कोपर ट्रेनने मुंबई गाठली . 


किल्याची सद्याची परिस्थिती : 
स्वान्त्र्यनंतर या किल्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही ,किल्यावर माजलेले रान आणि मोठमोठी झाडे या मुळे किल्याचे बुरुज ठसलेल्या अवस्थेत आहेत , सद्य पुरात्तव  विभागाने या किल्याचे डागडुगीचे काम हाती घेतले आहे ,किल्यावर सध्या प्री -वेडींग फोटोग्राफी करणाऱ्या जोडप्यांचा  फारच सुळसुळाट असतो . सोबत येणारे प्रेमी जोडपे यामुळे आणि त्याचा वावर या मुळे आपण किल्याचा पराक्रम विसरत चालो आहोत एवढे मात्र नक्की . 
पुरातर्न विभागाने याकडे लक्ष देऊन किल्याचे ऐतिहासिक महत्व राखण्यासाठी जागोजागी माहिती फलक लावले पाहिजे . आणि प्री वेडिंग फोटोग्राफी वाल्याकडून पैसे चार्जे करून त्याचा उपयोग किल्याचा डागडुजी साठी करावा हीच अपेक्षा .

संधर्भ : https://mr.wikipedia.org

आपल्या चॅनेल वरील वसईचा किल्ला वलॉंग नक्की पहा.

धन्यवाद !
अंकुश सावंत. 
+९१ ९७६८१५३११४

Monday, November 20, 2017

कर्नाळा किल्ला - आभाळात जाणारा उतुंग सुळका / Karnala fort

  पनवेल शहरामध्ये दोन उत्तुंग सुळके असलेले किल्ले आहेत एक म्हणजे कलावंतीणचा सुंदर सुळका ! आणि दुसरा म्हणजे कर्नाळा किल्याचा सुळका !!!

 खूप दिवस घरात बसून राहिल्यावर ,आपुल्या पहिल्या ट्रेकचे फोटो बघत दिवस जात होते. सर्वजण ऑफिस मध्ये व्यस्त त्यात सुट्यांचीन होणारी जुळवाजूळव  , एकामागून एक ठरलेले प्लान फ्लॉप होत होते . शेवटी मी ,प्रवीण आणि लहू जवळच कुठला तरी किल्ला करायचं ठरवलं.तन्मय ,समीर  आणि माही रोजचे भटके सुट्टी नसल्यमुळे  मुळे येऊ शकले नाहीत. ठरल्या प्रमाणे  शनिवारी सकाळी पहाटेच ६. ०० ची ट्रेन पकडून ठाणे गाठले . ठरल्याप्रमाणे प्रवीण सुद्धा आम्हला ठाण्याला भेटला .प्रवीणची आणि लहू ची ओळख करून दिली आणि पुढे निघालो ,ठरलेली पनवेल ट्रेन चुकली होती  मग नेरळ ट्रेन पकडून नेरळवरून पनवेल  गाठले.मग पनवेल वरून बस ने कर्नाळा गाठायच  ठरलं ,चॊकशी केल्यावर बस उशिरा असल्याचं समजलं मग वाट नबघता तिथूनच पुढच्या रिक्षास्टॅंड वरून  पळस्पे फाट्यावर  पोहचलो आणि मग तेथून परत  सहाआसनी गाडीने पेन-पनवेल महामार्गाने थेट  कर्नाळा गाठला .
कर्नाळा पक्षी अभयारण्य नकाशा
गडाच्या पायथ्याशीच पक्षी अभयारण्यचा पार्किंग मध्ये पोहचताच माकडांनी जणू स्वागतच केले ,कर्नाळा अभयारण्याचा  नकाशा निरक्षण झाल्यानंतर पुढे  निघालो , किल्यावर जाण्यासाठी पर्यटकांन ३०रुपये प्रत्येकी आकारले जातात आणि जर सोबत आपण पाण्याचा बॉटल्स नेत  असू तर आपणाला २०० रुपये ठेवूनघेतले  जातात आणि येताना आपण त्यांना परत बॉटल्स दाखवून आपले पैसे परत घायवेत,प्लास्टिक बॉटल्सला आळा  घालण्यासाठी केलेली सुंदर उपाययोजना आहे. 

 गेट पासूनच केलेल्या डांबरी रस्त्यावरून आमचा ट्रेक ला सुरुवात झाली . वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रपर्यटनाचे किल्याचा माहिती विषयक फलक वाचत आम्ही पायथ्याला  असलेल्या हॉटेल्स पर्यंत पोहचलो ,गावातल्याच महिला बचत गटाने चालवलेलं हे हॉटेल आहे .गरमागरम पोह्यांचा आस्वाद घेतला आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन पुढची वाट धरली .
जंगलातील काही सुंदर रानफुले
सुरवातीलाच काही पक्षी ,अभ्यारण्याचा बंद पिंजऱ्यात ठेवलेली आहेत ,सुरवातीला काही गरुड ,पोपट आणि ससांना  बघून पुढे निघालो ,आणि नंतर सुंदर मोराच दर्शन झालं. पिसारा फुलवून थुईथुई नाचऱ्या मोराला पाहण्याची आमची पहिलीच वेळ ..याच वर्णन करन केवळ अश्यक. बराच वेळ पिंजऱ्यतल्या पक्षी पाहून झाल्यानंतर पुढे किल्याकडे जाणारी वाट धरली .

थुईथुई नाचणारा मोर
खानावळीचा समोरून खाली जाणाऱ्या पायवाटेकडे असलेल्या ओढयाकडे आम्ही उतरलो ,पाऊस नसल्यमुळे  साठून राहिलेल्या पाण्याला, हिरवा शेवाळीचारंग चढला होता ..अभयारण्यातल्या एक माकडांचा कळप पाणी प्यायला तळ्यावर आला ... काही मस्त शॉट भेटले माकडाचा कळपांचे..थोड्या वेळाने परत हॉटेलच्या इथे येऊन आम्ही डाव्या हाताकडे जाणारी वाट पकडली.आणि ट्रेक ला सुरवात झाली. 

बॅगया पाटीवर लावून पुढच्या  मार्गी लागलो . उंचच्या उंच आभाळाकडे झेप घेणारी घनदाट झाडीमुळे बऱ्यपाकी पैकी थंडावा जाणवतो ,निरनिराळ्या पक्षांचे आवाज , उंचचउंच भली मोठी वर्षानुवर्षे उभी असलेली झाडी , आणि बऱ्यापकी मळलेली लालमातीची वाट हे सार अनुभवत  पाऊले पडत होती . जंगलातून जाणारी सरळ वाट आपण पकडावी उजवीकडे आणि डावीकडे जाणाऱ्या वाटाआपणाला दिसतात,पण आपण मात्र मळलेली सरळ वाट पकडावी , पक्षी निरक्षणासाठी आपण येथून  निरनिराळ्या भागात आपण जाऊ शकतो .पक्षी निरीक्षणासाठी आपणाला पहाटेच यावे लागते सुमारे १५०हुन अधीक पक्षी आपण पाहू शकतो. 

एक ते दोन तास घनदाट जंगल आणि मोठया मोठ्या खडकातून आणि लाल मातीला घट्ट धरून असलेल्या लांबच लांब झाडांच्या मुळां मधून  पायपीट केल्यानंतर आम्ही एका पठारावर येऊन पोहचलो ,घनदाट झाडी संपून संपूर्ण निळभोर आकाश आता नजरेत दिसत होता आणि समोर होता कित्यक वर्ष उभा असलेला ,गगनात जाणारा कर्नाळाचा सुळका !

पहिला दरवाजा
आता किल्ला नजरेत आल्यामुळे पाउलांची गती आपोआपच वाढली ,थोडावेळ चाल्यावर उजव्या बाजूला कर्नाळाई देवीचं मंदिर लागत ,देवी सींहासनारुढ आहे हातात तलवार असलेली सुबक मूर्ती आहे ,मूर्ती चांगल्या  सुस्थित  आहे .१९९४ साली सीताराम महाडिक यांनी या देवळाचा जिर्णोदर केला , देवी ला नमस्कार केला आणि थोडावेळ अराम करण्याचा निमित्ताने बाजूला असलेल्या शिल्प ओळखण्यासाठी प्रयत्न चालू झाले .मग ती शंकराची त्रिशूळधारी मूर्ती असल्याचा निष्कर्ष काडून  आम्ही पुढे निघालो. 
कर्नाळा देवीचं मंदिर
आता समोरच कर्नाळाचा पहिला द्वार आमचं स्वागत करत होता , दगडी खोदलेल्या पायऱ्या पार झाल्याकि पहिला मोडकळीस आलेला दरवाजा लागतो ,दरवाज्या वरच्या  चोकटी वर तीन शुभपुष्पे नक्षी कोरलेल्या आपणाला दिसतात ,दरवाजावर उभं राहिल्यावर आपणाला दिसतो कलावंतिणीचा सुळका,प्रभळगड ,मलंग गड , चंदेरी आणि माथेरानचा परिसर असा बुलंद आणि अजस्त्र सह्यन्द्रीची रांग !!! हा सर्व परिसर म्हणजे फक्त अप्रतिम !!!
 मग पुढे आपणाला लागतो सुस्थीत असलेला भक्कम दोन बुरुजांमद्धे असलेला महादरवाजा .काळ्यादगडांमध्ये कोरलेला हा दरवाजा एका वेळी एकच मनुष्य जाईल अशी याची रचना,यातून आत जाताना  बनवणाऱयांची कल्पकता अनुभवायला मिळते . दरवाजा पार केला कि आपणाला जुन्या इमारतींचे अवशेष  बघायला मिळतात , पूर्णपणे मोडकलेल्या अवस्थेत या इमारती आहेत , आम्ही आत पोहचलो साधारण दोनपदरी घरासारख्या छपरं असलेली इमारती आहेत . छपरं नष्ट झालेलं आहे , शक्यतो  दारुगोळा किंवा धान्य साठवण्यासाठी इमारतींचा वापर  असावा. 
काही भग्नावस्थतले इमारतींचे बांधकाम
पुढे काही इतिहासाची माहिती देणारे  फलक येथे लावण्यात आले आहेत , वाचल्यावर कळालेकि छत्रपती शिवाजी  महाराजांनी हा किल्ला यवनांकडून जिकून घेतल्यावर किल्लेदार म्हणून क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके यांची नेमणूक करण्यात आली होती .तिथून पुढे गेल्यावर आपण पोहचतो कर्नाळा किल्याचा प्रमुख आकर्षण असलेला सुळका .याची एकूण उंची आहे ४७५ मीटर ,चारी बाजूनी सुळक्याचा पोटात पाण्याचा टाक खोदलेला आहे . या खोदलेल्या पाण्याचा टाक्या पाहून मुरबाडचा गोरखगडावरील लेण्याची आठवण होते . या टाक्यांकमध्ये बाराही महिने थंड पाणी असते ,त्या मुळे इथेकायम थंडावा जाणवतो.इथे माकडांच्या मर्कटलीला आम्हाला पाहायला मिळाल्या . थोडावेळ सुळका पाहून झाल्यावर सुळक्यचा डावीकडची वाट पकडली ,मग एका ढासळलेल्या दरवाजामधून पुढे निघालो या दरवाजाला बाजूला शिपायी राहण्यासाठी छोट्या देवड्या उभारलेल्या आहेत  आणि मग आम्ही थोड्यादगडी पायऱ्या पार करून आ पोहचलो एका माचीवर . इथे हि एक पाण्याचं छोट टाक लागत .मग लागतो गडावरचा एक भक्कम दरवाजा ,काळ्यादगडात बांधलेला हा दरवाजाला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत , दरवाजा वर दोन्ही बाजूला  दोन शरभ शिल्प कोरलेली आहेत ,माहुली गडावरच्या शरभशिल्पचि आठवण झाली ,लहू आणि प्रवीणला याच शरभ शिल्पा विषयी मी सांगत होतो.पुढे असलेल्या माची वरची तटबंधी पाहून झाली , तटबंधी थोडी ढासळेल आहे पण दरवाजा आज हि सुस्थित आहे !!!
माचीवरून दिसणारा कर्नाळा किल्यावरच्या सुळका
घड्याळात २ वाजून गेले होते सूर्यनारायण जास्तच तापला होता आता विश्रांतीची खूपच गरज होती , त्यात आमच्याकडील पाण्याचा साठा  पण संपत होता .मग सोबत आणलेल्या चपाती फस्त केल्या आणि मग नेहमीप्रमाणे प्रवीणच्या बॅग मधून त्याचा आईनी दिलेल्या एकेक खाऊ निघू लागला , दही , दुधीची पेज , काकडी आणि सफरचंद .... वा वा मज्जा आली !!! मग मात्र बराचवेळ दरवाजा चा आत बसून अराम केला . बराच उशीर झाला होता मग आता गड उतरायला घ्यायचा होता . बॅग पाठीवर लावल्या ,बॅगांची ओजी बरीच कमी झाली होती 
तिसऱ्या दरवाजातील आतील काळया दगडाचे अप्रतिम बांधकाम
गडावरचा संपूर्ण परिसर नजरेत साठवून आम्ही गड उतरण्यास सुरवात केली पाऊले झपाझप पडत होती...पाण्याचा साठा कमी असल्याने नथांबता भराभर गड उतरण्यास सुरवात केली.मुख्य दरवाजा वर पोहचलो आपण वरती चडून आलेल्या पायऱ्या इथून पाहण्याची मज्जा काही औरच !!! 

पाउलांचा वेग वाढला होता ,ठरल्या पेक्षा बराच पटकन आम्ही गड अर्धा गड पार केला ,आता गर्द झाडी सुरु झाल्यामुळे उन्हाची झालं कमी लागत होती ,थोडावेळ विश्राम करून आम्ही पुन्हा पायपीट चालू केली .. चालताना प्रवीण ने पाऊसात केलेल्या कर्नालीचा आठवणी सांगत होता , ४५मिनिटाच्या आत  आम्ही हॉटेल पर्यंत पोहचलो . हात पाय धुऊन आम्ही थंड पाणीपिऊन गारेगार झालो .. मग मावशींनी जेवायची तयारी केली गरमागरम भाकऱ्या ,बाट्यातची आणि वाटयनाची उसळ ... आणि प्रवीण ने मटण आणि गरमगार  भाकऱ्या वर मस्त ताव मारला ... आपण पार केलेला सुळका पाहत आणि पक्षांच्या किलबिलाट मध्ये जेवणाची मज्जा काही औरच !!!

जेवण पटापट आटपून मग आम्ही कर्नाळा चा निरोप घेतला ,प्रत्येक ऋतू मध्ये किल्याची सोंदर्य सुदा वेगवेगळं असत मग ,पावसाळ्यात परत यायचं ठरवून आम्ही निघालो आमुच्या मुंबईकडे !!!







किल्याचा इतिहास  -  १२व्य ते १३व्य शकताली किल्याहची बांधणी आहे ,पुढे यादवांनी किल्यावर राज्य केलं ,१४ व्य दशकात मुस्लिमांनी किल्ला ताब्यात घेतला ,मग पुढे शकतात निजामशाही ने किल्ला जिंकला मग पुढे १६७० मध्ये कर्नाळा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला . पुढे मग पुरंदर चा तहा मध्ये मुघलांना द्यावा लागला , पुढे परत मराठ्यांनी किल्ला जिंकला ,आंग्रे ,पेशवे यांनी किल्यावर राज्य केलं , शेवटी मग ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला .


किल्याचा प्रकार - गिरिदुर्ग 

उंची - ४४५ मीटर 

किल्यावर जाण्याचा मार्ग - पनवेल स्टेशन वरून बस किंवा
टमटम ने आपण पळस्पे फाट्यावर पोहचा प्रत्येकी २० रुपये घेतात तेथून पुढे परत आपण कर्नाळाकडे जाणारे ऑटो पकडावी १५ रुपये प्रत्येकी घेतले जातात  . 

खाण्याची सोया - गडाच्या पायथ्याशी खाण्याची सोय होते ,गडावरती जाताना पिण्याचा पाण्याची सोया नाही ,पाणी मुबलक प्रमाणात स्वतःकडे ठेवावे . 

धन्यवाद !!
अंकुश 

Wednesday, August 2, 2017

माहुलीगड - ठाणे जिल्यातील उंच शिखर ( Mahuli Fort )

पावसाळा सुरू झाला की ओढ लागते ती भटकंतीची ..मी समीर ला सांगत होतो कुठेतरी जबरदस्त ट्रेक प्लान करायला, कलावंतीण ट्रेक च्या वेळी तिकोना ठरला होता पण,ऑफिस मध्ये तन्मयने "माहुली किल्याला भेट द्यायची का?" अस विचारलं आणि मग तिकोना चा प्लॅन थेट ठाणे जिल्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या  माहुलीगडावर आला.

मग थोडीशी ऐतिहासिक माहिती गूगल वरून शोधली.किल्याचा इतिहास खूपच रोचक आहे ... 
किल्याची मूळ उभारणी कोणी केली ती माहिती उपलब्द नाही ,शहाजीराजे  निजामशाही चे  संचालक बनल्यावर निजामशाही ला वाचवण्यासाठी त्यांनी माहुलीगडाचा आधार घेतला . १६३५-३६ च्या सुमारास बालशिवाजी आणि माता जिजाऊंना त्यांनी शिवनेरीहून माहुलीला आणले .. पुढे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला पुढे १६५८ मध्ये शिवरायांनी हा किल्ला मोघलांकडून परत मिळवला .. १६६१ ला परत मुघलांच्या ताब्यात गेला आणि लगेच तो परत जिंकला आणि १६६५ च्या पुरंदर तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले(www.marathimati.net/mahuli-fort/)

अशा ऐतिहासिक किल्याला भेट देण्यासाठी उत्सुकता अगदी शिगेला पोहचली होती. वीकएंड दिवशी माहुलीगडच्या पायथयशी असलेल्या थबठब्यात भिजण्यासाठी तरुणाईची गर्दी होते ,मग गर्दीच्या दिवशीं नको म्हणून  आम्ही गुरुवारी जायचं ठरल .पण,ऑफिसला सुट्टी नसल्याने तन्मय आणि प्रवीण काही येऊ शकले नाही यावेळी समीर आणि महेंद्र सोबत दोघे  घाटकोपरकर  येणार होते समीरचा मोठा भाऊ सचिन आणि त्यांचा मित्र सुरज. 

ठरल्याप्रमाणे भल्या सकाळी उठून आईने दिलेल्या भाकऱ्या,पाऊस जोरदार असल्याने जॅकेट आणि मोबाईलला पिशव्या घेऊन प्रस्थान झाले...घाटकोपर वरून समीरने सांगितलेल्या ६.२५ची ट्रेन बरोबर पकडली. 8 वाजता आसनगावला पोहचलो. सुरज सोडून सर्वाना याआधी भेटलेला मग .सुरजची ओळख समीरने  करून दिली आणि बोलत बोलत पुढे निगालो . स्टेशनलाच एक अण्णा इडली वाला दिसला आणि आत्ता इथेच नष्ट उरकायचा ठरलं, सकाळी लवकर नाश्ता नकरताच निघाल्यामुळे सर्वानीच 'इडली आणि उत्तपावर' मस्त ताव मारला."हल्ली मुंबई मध्ये वडापाव ऐवजी ह्या साऊथ इंडियन इडलीची चव चांगली लागायला लागलीय..."

स्टेशन बाहेर माहुलीगावात जाणाऱ्या रिक्षा मिळतात . ५जणांचे ३००रुपये सांगितले .थोडं खर्चिक होत पण बससाठी बराच वेळ असल्याने रिक्षाकरून पुढे निघालो. नाशिक मुंबई मार्गवरून शहापूर फाट्याला रिक्षावळवून  माहुलीगावात निघालो .  पेट्रोल पंप ला रिक्षा थांबवून  रिक्षा वाल्या काकांनी ऑटोला डिझेल चाखाऊ दिला...पुढे जाताना मानसमंदिर लागत...पुढे पक्का रस्ता कच्चा होत गेला..गावात जाताना गडूळ पाण्यानी जोरदार वेगाने खळखळ करत निघालेली नदी लागली...पुढे आत्ता रस्ता म्हणजे निवळ खडे लागले होते ... गावकऱ्यांची शेतीची लगबग चालू होती ,रस्त्याला लागूनच आदिवासी लोकांची घरे लागतात.घर नाही बोलू शकणार आपण याला पाडे बोलू शकतो.निगडी किंवा सरळ झाडांच्या खांदयने बांधून त्यावर लालमतीचा दिलेला लेप...
                           माहुलीगडाची कमानी 
जवळपास ३०ते ४० मिनिटाच्या ४किलोमीटर च्या प्रवासानंतर आम्ही माहुलीगडच्या पायथयशी पोहचलो...किल्याच्या पायथयशी एका काकांची हॉटेलसारखी टपरी आहे .हसून काकांनी स्वागत केलं..चहाची सर्वांनाच गरज होती गरमागरम चहा झाला ...काकांआम्हला पुढे कस जायचं ते सांगत होते .त्याना वाटलंकि आम्ही वॉटरफल मध्ये जाण्यासाठी आलोय...किल्ल्याच सांगीतल्यावर मग त्यानी गेट मधून जाऊन जवळपास ३ तासची चढाई आहे म्हणून सांगितले..गेल्याच रविवारी माहुली  थबधब्यात मद्यधुंद असलेला कुण्या "पाटलाचा पोरगा मेला" ही बातमीही त्यानी आमच्या कानावर घातली..धबधब्यात गेलात तर काळजीपूर्वक जा असं सांगितलं...मग आम्ही निघताना त्यांचाकडेच जेवणाचा बेत आखून पुढे निघालो .
नदीशेजारच बाप्पाचं सुंदर मंदिर. 
ट्रेकची सुरवातच पाऊस आणि नदीशेजारच्या बाप्पाच्या सुंदर दर्शनाने झाली.अप्रतिम मंदिर आहे...पुढे माहुलीगडाच्या कमानीतून आत प्रवेश केला . या परिसराचा महाराष्ट्रसरकारने पर्यटनस्थळ म्हणून विकास केला आहे...गेट वर प्रत्येकी २५ रुपये द्यावे लागतात, परिसरात किल्याची ऐतिहासिक माहिती देणारे फलक लावलेले आहेत ...कृत्रिम पशु आणि पक्षांचे  पुतळे बसवले आहेत...बऱयापैकी विकास केला आहे इथला.माहुलीच्या या सुरवातीच्या जंगलातून जाणारी ही वाट थेट नदीचा कटापर्यंत जाते पूढे सुंदरसा ब्रिज पार करून आम्ही उजवीकडून किल्याचा वाटेकडे निघालो .दोन फुटणाऱ्या फाट्यावर पर्यटनस्थळचे पाट्या लावले आहेत ..आम्ही आत्ता माहुलीच्या जंगलातली मळलीले पायवाट धरली आणि ट्रेक खऱ्या अर्थाने सुरू झाली घनदाट झाडी असल्याकारणाने आजूबाजूचा परिसर नजरेत येत नव्हता ..पावसाने सुरवातीपासूनच जोर घेतला होता..माही आणि सुरज दोघे पुढे पटापट निघाले  मी, समीर आणि सचिनदादा हळू हळू मार्गक्रमण चालत होतो...जवळपास अर्धा तास चालल्यानंतर घनदाट जंगल संपून खडा चड सुरू होतो...खरा ट्रेक चालू झाला होता...दादाची पहिलीच ट्रेक असल्याने सुरवातीला दमछाक होणे साहजिकच होते.
प्रत्येक किल्यावर अस एक ठिकाण असत जिथे पोहचलो की फोटोग्राफी चा मोह आवरत नाही अशा एक पठारसारखा भाग जेथून संपूर्ण आजूबाजूचा परिसर दिसून येत होता तिथे थोड्या वेळ आराम करून आम्ही निघालो....पण धुक्याची शाल पांघरल्यामुळे जास्त काही दिसत नव्हतं...जरावेळ ठावरून पुढे निघलो...

सह्यन्द्रीची अजस्त्र डोंगररांग आणि त्यावरून कोसळणारे धबधबे 
आमची चढाई माहुलीच्या  दिशेने चालू होती..तानसा अभयारण्य म्हणून ओळखला जाणाराहा परिसर अतिशय सुंदर आहे.जोरदार पाऊस असल्याने धुक्याने पूर्ण शाल पांघरलेली.माहुली गडाची डोंगररांग धुक्यामध्ये हरवलेली होती.आम्ही थोडीशी मध्ये मध्ये विश्रांती घेत भराभर चालत होतो..पाऊस आणि धुक्याचा खेळ बघण्याचं भाग्य आम्हला आजलाभत होत.क्षणात दृष्टीस येणारी डोंगररांग क्षणात येणाऱ्या धुक्यामध्ये नाहीशी होयची ... पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्यामुळे डोंगररांगमधून जोरदार वेगाने कोसळणारे धबधबे स्पष्ट पने दिसत होते.आणि क्षणात हा सर्व परिसर आमच्याकडे येणाऱ्या धुक्यामध्ये हरवून गेला.सर्व काही भन्नाट!!!कवी बालकवींचा काही ओळी आठवतात... 
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे"

येथे मात्र उन्हा ऐवजी धुकं होत.आत्ता भराभर पाऊले टाकत चालो होतो..मागच्या ट्रेकच्या आठवणींना उजाळा देत पावलं पडत होती . विकटगड सारखाच हा परिसर आहे . वाटेत एक दोन रॉकपॅच आहेत..सर्वानी सांभाळून पार केले..अतिउत्साह इथे टाळावा..जवळपास तीन ते चार किलोमीटरचा खडा चड पार करून आम्ही शिडीच्या वाटेपर्यंत पोहचलो.समोरच्याच एका मोठ्या कातळावर बॅग टाकल्या.  कातलावरून पाठीमागचा  पूर्ण सह्यन्द्रीचा परिसर,धबधबे  आणि समोर माहुलीगडाची तटबंदी आणि त्यावर फडकत असलेला भगवा !!!सर्व नजारा अप्रतिम.. !
                          गडावर जाणारी शिडीची वाट 
पाऊस असल्याने तहानजास्त लागली नव्हती ,आम्हीही पाण्याचा फक्त दोनच बॉटल्स आणल्या होत्या..कातळावर बसून मस्त दोनचार फोटो घेतले...माहि बॉटल घेऊन कड्यावरून थेंबथेंब पडणार पाणी बोटलमध्ये भरत होता..सोबत आणलेली बिस्कीट खाऊन शिडी चढायला सुरू केली..वनविभागाने ही शिडी लावलीय...शिडी नसली असती तर गिर्यारोहनचा अनुभव आणि साहीत्य  असणं आवश्यक आहे..लोखंडी शिडी काळजीपूर्वक पार झाली.. इथे काळजीपूर्वक पाय टाकावेत.. प्रथम दादा आणि नंतर सर्वानीच एके एक करत शिडी पार केली...आणि आम्ही आमच्या भगव्या लक्ष्याकडे पोहचलो..वरून दिसणाऱ्या नजऱ्यामुळे तीनकिलोमीटरचा टप्पा पार करून आल्यानंतरचा थकवा पूर्णपणे कुठे तरी निघून गेला...संपूर्ण परिसर म्हणजे निसर्गच नयनरम्य दृश्य ज्याची तुलना कोणाशीही होऊ  शकत नाही...फोटोग्राफीची हौस येथे भागवून घेतली मग  सर्व आसमंत नजरेत साठवत बराच वेळ येथे आम्ही सर्वांनी घालवला, .

गडावर तर पोहचलो आत्ता पुढे जाण्याचा मार्ग कसा कोणालाच माहीत नव्हत सर्वांनी यू ट्यूब वर बघतलेला महादरवाजा आणि देवड्यांचे अवशेष एवढच कायते माहित .पण नेमकं कुठे जायचं हे कोणालाच ठाऊक नव्हतं मग,एक मळल्या वाटेने पुढे जाण्याचं ठरलं ...डावीकडे जाणारी वाट पकडली आणि थोड्यच वेळात आम्हला पाण्याचं टाक लागलं...आम्ही बरोबर चालतोय याची ती खून होती . त्या टाकाची पाहणीकरत थोडा वेळ घालवला आणि पुढे निघालो . 
महादेवाची पिंड 
थोड्याच वेळात आम्हला भंडारगडाकडे जाणारी पाटी दिसली आम्ही तिकडे परतीच्या वेळी जाण्याचं ठरवून आम्ही महादरवाजाचा शोध घेण्यासाठी पुढे निघालो...थोड्याच वेळात आम्ही महादरवाजाच्या परिसरात पोहचलो..निसरड्या वाटेवरून उतरून शेवटी ज्याचा शोध घेत होतो त्या  एतोहासिक महादरवाजा पर्यंत पोहचलो. होतो .भारीच वाटत होत .सुरवातीला एक पाण्याच टाक लागत पुढे पिपळाच्या झडकली भग्नावस्थेतील महादेवाची पिंड त्याचा अगदी समोर महाराजांची छोटीशी सिहासंन आरूढ मूर्ती लागते ...नतमस्तक होऊन पायऱ्या उतरून महादरवाजकडे आलो..दोनीही बाजूला सैनिकांच्या राहण्याचा देवड्या लागतात..आणि नंतर महादरवाजा ...महादरवाजा हा भग्नावस्थत आहे...गडाची तटबंदी बऱयापैकी शाबूत आहे..महादरवाजाचा पायथयशी दोन शरभ शिल्प लागतात आणि एक कामळासारखं शिल्प आढळत...पायऱ्या उतरून नंतर आम्ही बुरुजावरून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला.. हा सर्व ऐतिहासिक वारसा अनुभवताना सर्वचजण दंग झाले होते...
महादरवाजा 
शरभ शिल्प
 बराच वेळ घालवल्यावर आम्ही पळसगडाच्या शोधात निघालो .आमची मोहीम  उत्तरेकडे वळवली ...पाऊस आत्ता जोरदार चालू झाला होता.वाटेतील ओढे वेग घेऊन वाहू लागले होते.झुडप मानेपर्यंत आली होती.झुडपांमुळे थोडा अंधार झल्यासारखं वाटत होत ..दोनीबाजूला कार्वीच जंगल आणि समोर दिसणारी मळवट वाट भराभर पार करत होतो ...महिच्या पाटी आम्ही झपाट्याने चालत होतो...बराच वेळ चालून ही काहीच भेटत नव्हतं .. थोडी निराशाच झाली मग सर्वांच्या अनुमतीने मग परत फिरायचा ठरलं...धोधो पावसातून  पळसगड शोधण्यासाठी केलेली हि पायपीट खूपच थरारक होती..कधीही नविसरता येणारा अनुभव होता...
अश्वारूढ छत्रपती महाराजांची मूर्ती 

आम्ही परत महादरवाजकडे पोहचलो तर ७ते ८ मुलांचा ग्रुप किल्याची पाहिनी करण्यासाठी आला होता आम्ही काहीच नविचारता पुढे निघालो .चालून खूप थकवा आला होता पाऊसाने विश्रन्ती घेतली होती आम्ही हि सोबत आणलेली बिस्केट फस्त केली. आणि बिस्किटाचे पॉकेट्स पार्ट खिशात टाकून प्रवास चालू ..आता माहुली , पळसगड दोन टोकानंतर आता भंडारगडाकडे मोहीम वळवायची होती. भंडारदर च्या खालचा वाटेकडे पायपीट चालू केली , पाऊसाने परत जोर धरला होता..वाटेमध्ये गुडग्या एव्हडं पाणी असलेलं ओढे हातांची साखळी करत पार केले ..दाट झाडी असल्याने सावधगिरीने खाली वाकून काटेरी झुडपं पार करावी लागत होती.थोड्याच वेळात आम्ही दोन पडक्या वीरगळी पर्यंत पोहचलो पुढे पडलेल्या वाड्याचे अवशेष लागतात .पाऊले पटापट पडत होती सौन्दर्याने नटलेल्या अफाट जंगलातून आम्ही एका पडलेल्या महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहचलो.. मंदिरासमोरच नजर पोहचणार नाही एव्हडा मोठं तळ आहे.सर्व काही बघून थोडं पुढेपर्यंत गेलो मग पुढे काहीच नाही असल्याचा समज करून आम्हीपरतीच्या मार्गाला लागलो ...

आम्हला वाटेमध्ये परत तीच मुलं  भेटली त्यानां  विचारणा केली ,कुठून आलो असविचारल्यावर "हिंदी मे बोलो "
असं बोला मग कळलं कि मध्यप्रदेश वरून किल्याला भेट द्यायला ते आले होते . खरच कुतूहल वाटलं त्यांचं . एकीकडे हि मंडळी एवढ्या लांबून किल्ला बघायला आली होती आणि एकीकडे आमची मराठी तरुणाई मध्यधुंद स्थितीत धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत होती.
निसर्गच्या कुशीतले काही निवांत क्षण 
आम्ही किल्यावरच्या बऱ्याच गोष्टी पाहण्याचा राहून गेल्या होत्या पण वेळेअभावी परत मागे फिरण्याचा निर्णय सर्वानी घेतला .पाऊले पटापट खालच्या मार्गाला लागली .पाऊस ओसरला होता किल्यावर जातांना धुक्यात हरवलेला डोंगरमाळ आणि त्यावरचे पांढरेशुब्र धबधबे आत्ता स्पष्ट दिसत होती निसर्गाच्या अजस्त्र रूपाचा अनुभव आम्ही घेत होतो .सर्वजण शांतपणे नबोलता चालत होते .. पाय अगदी मोडकळीस आले होते उतरताना नेहमीच चढण्यापेक्षा जास्त त्रास होतो...चालताना बरच काही मनात चाक होत बऱ्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या पण, ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी केलेली थरारक आणि जबरदस्त भटकंती , भग्नावस्थेत असलेला महादरवाजा , मंदिराचे अवशेष सर्व काही मनाचा एका कोपऱ्यात घर करून गेलं होत,,!
बराच वेळाच्या पायपिटीनंतर आम्ही टपरीवर पोहचलो जेवण तयार होत पोटात भुकेने  कावळे ओरडत होते . काकांनी जेवण वाढलं ..गरमागरम भाकऱ्या , वांगयची भाजी ,मटण आणि वारणभातावर सर्वानीच ताव मारला .. .संगीतल्याप्रमााने रिक्षा वाले काका आम्हला घायला आले होते..परतीचा प्रवास सुरु झाला... 

आजचा दिवस अगदी सार्थकी लागला होता..ना फोनची रिंग,ना गाड्यांचे आवाज,  निरव शांतता...सर्व काही भारीच...!!!




किल्याचे नाव - माहुलीगड 

प्रकार - गिरीदुर्ग

उंची-2815

श्रेणी - मध्यम ते कठीण

जाण्याचा मार्ग -आसनगाव रेल्वेस्टेशन - माहुलीगाव 

बघण्यासारखं  -  प्राचीन पाण्याची टाके , महादरवाजा , पहारेकार्यनच्या देवड्या , भडारगडावरच भग्नावस्थेतील महादेव मंदिर , समोरचा तलाव पुढे गेल्यावर जांभळाच्या राय आणि नंतर लागते ती माहुली आणि भदारगडामधली खिंड आणि त्यामधला कल्याण दरवाजा , वरून दिसणारा अलंग ,मलंग,हरिश्चंद्रगडाची डोंगररांग

धन्यवाद !
अंकुश सावंत
+९१ ९७६८१५३११४